AGRI ADMISSION NEWS : देशातील शेतकऱ्यांना रोज नवीन नवीन संकटांना समोर जावे लागते. त्यामुळे नवीन पिढी या क्षेत्रामध्ये येण्यासाठी धजावत नाही. शेतीची अशी स्थिती असताना शेती क्षेत्राशी संबंध असलेल्या अभ्यासक्रमाकडे येण्याकडे देखील विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण कृषी अभ्यासक्रमाशी संबंधित जेवढ्या जागा आहेत तेवढेच अर्ज आल्याचे परिस्थिती आत्ताच दिसत आहे.
शेती अभ्यासक्रमाकडे विध्यार्थाचे दुर्लक्ष AGRI ADMISSION NEWS
हल्ली शेती करणे हे जिकिरीचे बनले असून, विविध प्रकारचे आसमानी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. त्यामुळे नवीन पिढी हल्ली या क्षेत्राकडे वळताना दिसत नाही. ही झाली शेती या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून बघण्याची दृष्टी परंतु शेती संबंध असलेले अभ्यासक्रम याकडे देखील विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे कारण सध्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची लगबग चालू आहे. या प्रवेशाच्या नोंदणीसाठी कृषी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी तीन वेळेस मुदतवाढ देऊन देखील विद्यार्थ्यांची नोंदणी ही पाहिजे त्याप्रमानात झालेली नाही. त्यामुळे जेवढे अर्ज तेवढेच जागा अशी परिस्थिती यावर्षी निर्माण झालेली दिसत आहे.
AGRI ADMISSION NEWS का निर्माण झाली आहे अशी परिस्थिती.
शेती हा व्यवसाय निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे त्यामुळे कधीकधी दुष्काळ पडणे. कधी अतिवृष्टी होणे किंवा कधी मालाला योग्य भाव न मिळणे या कारणामुळे शेतकरी नेहमी संकटात सापडलेला असतो. आणि ही परिस्थिती शेतकऱ्याचा मुलगा जवळून पाहत आहे. त्यामुळे विद्यार्थी या क्षेत्राकडे येण्यासाठी मनातून तयार होत नाहीत तसेच या क्षेत्राशी संबंधित असलेल्या अभ्यासक्रमाकडे देखील विद्यार्थी दुर्लक्ष करत आहेत कारण सध्या काही महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित असे प्राध्यापक वर्ग नाहीत. योग्य भौतिक सुविधा नसणे अशा कारणामुळे विद्यार्थी या क्षेत्राकडे वळण्यास तयार नाही तसेच अनेक वर्षंपासून शेती क्षेत्राशी संबंधित असलेल्या नोकर भरती आहेत त्या बंद आहेत त्यामुळे त्या व्यवसाय या अभ्यासक्रमात पूर्ण करून समोर नोकरी मिळण्यास देखील अडचणी येत आहेत त्यामुळेच विद्यार्थी या क्षेत्राकडे येण्यास तयार नाही.
AGRI ADMISSION NEWS काय आहे राज्यातील प्रवेशाची स्थिती.
राज्यामध्ये सध्या चार कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत एकूण 174 कृषी महाविद्यालय असून, या महाविद्यालयांमध्ये एकूण 17 हजार 906 एवढी प्रवेश ची क्षमता आहे. केल्यात काही वर्षापासून कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा पाहायला मिळत होती परंतु या चालू वर्षांमध्ये तीन वेळा मुदतवाढ देऊन देखील विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. म्हणून या वर्षी प्रवेशासाठी स्पर्धा बघायला काही मिळणार नाही.
कृषी महाविद्यालयांची स्थिती
एकूण शासकीय महाविद्यालय राज्यामध्ये 46 आहेत.
खाजगी महाविद्यालय 128 आहेत.
कृषी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत ही 15 जुलै 2024 ठरविण्यात आली होती.
पहिली मुदतवाढ 22 जुलै देण्यात आली.देण्यात आली.
तिसरी मुदतवाढ 31 जुलैला देण्यात आली.
अशाप्रकारे तीन वेळेस मुदतवाढ देऊन देखील या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली नाही.नवीन पिढी हि शेती कडे व्यवसाय म्हणून देखील यायला तयार नाहीत तसेच या क्षेत्रामध्ये संधी कमी आहेत असे कारणे देऊन या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यास तयार नाही असे चित्र सध्यातरी दिसत आहे.