MAHARASHTRA BUDGET अर्थ संकल्पातून कृषी क्षेत्रासाठी काय मिळणार

राज्यात होऊ पाहणाऱ्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अर्थ संकल्पामध्ये विविध अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तर या अर्थ संकल्प मध्ये कोणासाठी काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहू या .

MAHARASHTRA BUDGET कृषी क्षेत्रासाठी काय

1. राज्यातील कृषी पंपांचे वीजबिल वाढलेले असतांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात अली . सुमारे ४४ लक्ष शेतकरी यांना या योजनेचा फायदा होईल . ७. ५ हॉर्स पॉवर क्षमतेच्या कृषी पंप साठी १४७६१ कोटी रुपये अनुदान स्वरूपात देण्यात येतील . तसेच विजेवरील भार कमी करण्याकरिता ८. ५ लक्ष सौर पंप देण्याची घोषणा करण्यात आली .

2. नैसिर्गिक आपत्ती मुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी जुलै २०२२ पासून १५ हजार २४५ कोटी रुपयांची मदत .

3.नोव्हेंबर – डिसेम्बर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस बाधित २४ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २२५३ कोटी रुपयांची मदत.
4.नुकसान क्षेत्राची मर्यादा दोन हेक्टर वरून वाढून ३ हेक्टर पर्यंत वाढवून वाढीव निधी वाटप .

5.खरीप हंगाम २०२३ मध्ये ४० मंडळामध्ये दुष्काळ तर १०२१ महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती लागु करून निधी वाटप .

6.नुकसानीचे पंचनामे जलद होण्यासाठी ई -पंचनामा प्रणाली लागू .
7.नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण ९२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना ५३१८ कोटी ४७ लाख अनुदान .

8.महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परत फेड करणाऱ्या १४ लाख ३३ हजार पात्र शेतकऱ्यांना सुमारे ५२०० कोटी रुपये मदत वाटप व उर्वरित रकमेचे वाटप देखील लवकरच होणार .

9.नानाजी देशमुख कृषी सांजवनी योजनेचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यात राबवला जाणार .

10.राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य पुरुस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेती उपयोगी यंत्र खरेदी साठी शेतकऱ्यांना अनुदान .

11.गाव तिथे गोदाम योजने अंतर्गत १०० नावीन गोदामाचे बांधकाम होणार तशेच आधीच्या गोदामांची दुरुस्ती होणार.

12कापूस सोयाबीन अन्य तेल बिया यांच्या मूल्य साखळी विकासाठी ३६१ कोटी रुपयांचा निधी .

13.खरीप पणन हंगाम २०२४ -२५ मध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५००० रु हे रुपयांचे २ हेक्टर मर्यादेत वाटप होणार.

Leave a Comment