sour krushi vahini yojna या योजनेअंतर्गत शेतीला मिळणार दिवसा अखंडित वीजपुरवठा

sour krushi vahini yojna : शेतीला सिंचनासाठी दिवसा अखंडी आणि हमखास वीज पुरवठा व्हावा याकरिता शासनामार्फत सौरपंप योजना सुरू करण्यात आलेली आहे. सौर पंप च्या माध्यमातून शेतीला वैयक्तिक स्वरूपाचा सौर पंप पुरवठा करणे सुरूच आहे. त्याचप्रमाणे शेतीला वीजपुरवठा करणारे कृषी फिडर देखील आता सौर पंपाच्या वर कार्यान्वित करणे सुरू आहे.

sour krushi vahini yojna

महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ दशलक्ष ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२% वीज वापरतात. सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकर्‍यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. दुसरीकडे, राज्यातील उद्योग-व्यवसायांना त्यांची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी माफक दरात वीज पुरवठा करावा, अशीही जोरदार मागणी होत आहे.

या समस्यांवर मात करण्यासाठी, “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” नावाची एक अभिनव योजना जून २०१७ मध्ये सुरू करण्यात आली, ज्यामध्ये २ मेगावॉट ते १० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प कृषीप्रधान उपकेंद्रापासून ५ किमी त्रिज्येत स्थापित केले जातील. शेतीपंप फीडर सोलरायझेशनचे अफाट फायदे पाहता, महाराष्ट्र सरकारने भागधारकांशी तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर योजनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने या योजनेची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (MSKVY २.०) म्हणून पुनर्रचना केली आणि शीघ्रगतीने एकूण ७००० मेगावॉट विकेंद्रित सौर प्रकल्प राबवून, सन २०२५ पर्यंत सुमारे ३०% फीडरचे सोलरायझेशनचे उद्दिष्ट ‘मिशन २०२५’ म्हणून निश्चित केले आहे, ज्यामध्ये शेतक-यांना दिवसा वीज देण्यासाठी 0.5 मेगावॅट ते 25 मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून 5 – 10 किमी परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापित केले जातील.

 

सौर कृषी वहिनी योजनेचे उद्दिष्ट वाढवले sour krushi vahini yojna

शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषी फिडर हे ही सौर ऊर्जा पंपावर आधारित टप्प्याटप्प्याने  कार्यान्वित केले जाणार आहे. याचाच भाग म्हणून एकूण कृषी  फिडर च्या 30% फिडर हे सर्व सौर पंपावर आधारित केले जाणार आहे. त्यासाठी सौर ऊर्जाच्या प्रकल्पांना गती देण्यात आलेली आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मितीचे उद्दिष्ट हे 7 हजार  मेगावॉट ने वाढून एकूण 16 हजार मेगावॉट  पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 छत्रपती संभाजीनगर येथे तीन मेगावॅट प्रकल्प  

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात पहिला सौर ऊर्जा प्रकल्प धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्या प्रकल्प यामुळे 1753 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करने शक्य झालेले आहे. अशा प्रकारे कृषी फिडर सौर ऊर्जा पंपाशी सुरू सौर ऊर्जावर आधारित वीज पुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे.
अशा प्रकारे शेतीला सिंचनाची गरज लक्षात घेऊन शेतीला अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे शेतीला वीज उपलब्ध होईल व विजेवरील भार कमी होईल सौर ऊर्जेमुळे शेतकरी यांना मदत होणार आहे.

Leave a Comment